У нас вы можете посмотреть бесплатно कसाबखेड़ा में सनसनीखेज वारदात आरोपियों की तुरंत गिरफ्तारी की मांग पुलिस पर सवाल निशान или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
चाकू हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करा; कसाबखेडा ग्रामस्थांचा खुलताबाद पोलिस ठाण्यात ठिय्या ————————————— खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा येथे किरकोळ वादातून एका तरुणावर चाकूने भोसकून प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत राजमहम्मद रफिक शेख (वय ३२, रा. कसाबखेडा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. घटनेतील आरोपींना अद्याप अटक न झाल्याने मंगळवारी कसाबखेडा येथील संतप्त ग्रामस्थांनी खुलताबाद पोलिस ठाणे येथे मोठी गर्दी केली. जखमी राजमहम्मद शेख हे घाटी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना आरोपी मोकाट फिरत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामीण पोलिस अधीक्षकांना निवेदन देत आरोपींना तातडीने अटक करण्याची ठाम मागणी केली. तक्रारीनुसार, आठवडी बाजारानिमित्त दुचाकी लावत असताना झालेल्या वादातून हा प्रकार घडला. राधाबाई शंकर शिंदे यांनी कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर त्यांनी धक्काबुक्की केली व नातेवाइकांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर प्रीतम लोंढे, विजय आव्हाड, ईश्वर शेलार, आदी आव्हाड व विकी आव्हाड हे घटनास्थळी आले. सर्व आरोपींनी मिळून राजमहम्मद शेख यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, राधाबाई शिंदे यांनी आपला मुलगा आकाश शिंदे याला कटलरी दुकानातून चाकू आणण्यास सांगितले. आकाश शिंदे याने दोन चाकू आणल्यानंतर राधाबाई शिंदे व आकाश शिंदे यांनी राजमहम्मद शेख यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात राजमहम्मद शेख गंभीर जखमी झाले. या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश झलवार करीत आहेत. मात्र, गुन्हा दाखल होऊनही अद्याप आरोपींना अटक न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. #aurangabadsamachar