У нас вы можете посмотреть бесплатно शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी विधानसभेत आ. सुभाष देशमुख यांची मागणी... или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाराष्ट्रातील सर्वच कृषी उत्त्पन्न बाजार समितींच्या कार्यक्षेत्रातील सात-बारा धारक शेतकऱ्यांना संचालक निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्याची मागणी आ. सुभाष देशमुख यांनी विधानसभेत कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या सुधारणा विधेयकावर बोलताना केली. महाराष्ट्र सरकारचे सन २०१६ मधील पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरु आहे, मंगळवार, दिनांक १५ मार्च रोजी विधानसभेत कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या सुधारणा विधेयकावर बोलताना आ. सुभाष देशमुख यांनी सदर मागणी केली. पुढे बोलताना आ. देशमुख म्हणाले कि, महाराष्ट्रात कृषी उत्त्पन्न बाजार समित्यांची स्थापना शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या मालाला भाव मिळण्यासाठी, त्यांना न्याय मिळण्यासाठी करण्यात आली आहे. परंतु, सदर बाजार समितींच्या निवडणुकी दरम्यान मतदानाचा अधिकार ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य इ. प्रतिनिधीना देण्यात आल्यामुळे बाजार समित्यांचा खरा लाभधारक हा मतदानाच्या अधिकारपासून वंचित राहिला आहे. सध्याचा प्रक्रियेत मतदान करणारे व निवडून जाणारे ठराविक लोक असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न मांडणारा, न्याय मिळवून देणारा, त्यांच्यासाठी भांडणारा प्रतिनिधी संचालक म्हणून पाठीवण्याची इच्छा असताना सुद्धा ते हतभल आहेत आणि यामुळेच शेतकऱ्यांची लुबाडणूक करणारी एक मोठी साखळी बाजार समित्यांमध्ये तयार झाल्याचे दिसून येत आहे. जर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल, त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर कृषी उत्पन्न बाजार समिती सुधारणा विधेयकात शासनाने सदर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व सात-बारा धारक शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासंदर्भात सुधारणा करण्याची मागणी आ. सुभाष देशमुख यांनी केली.