У нас вы можете посмотреть бесплатно कोरोना विषाणू или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चीनमध्ये आतापर्यंत ७२३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३१ हजाराहून अधिक जणांना विषाणूचा संसर्ग झाला आहे. सिंगापूरमध्ये ३३ जणांना विषाणूची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं असून, सिंगापूरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चीनमधल्या वुहान शहरातून भारतात परतलेल्या ६४५ नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी देशातल्या १२ महत्त्वाच्या बंदरांवर प्रवाशांची तपासणा आणि त्यांच्यावरील उपचाराची यंत्रणा उभारण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी काल राज्यसभेत दिली. चीनमध्ये अद्यापही ८० भारतीय विद्यार्थी असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी काल राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. कोरोना संदर्भात देशातली परिस्थिती आटोक्यात असून, यासाठी नियमितपणे देखरेख सुरु असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी दिली आहे. आतापर्यन्त १ हजार २७५ विमानांतून भारतात आलेल्या १ लाख ४० हजार प्रवाशांची तपासणी केल्याचं आणि कोणताही रुग्ण आढळून न आल्याचं सुदान यांनी सांगितलं. राज्यात काल ५ जणांना रुग्णालयात निरिक्षणाखाली दाखल करण्यात आलं आहे. पुणे इथं तिघांना तर अहमदनगर आणि जळगाव इथं प्रत्येकी एक जण भरती करण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यामध्ये 25 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहं. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत १६ हजार ६३ प्रवासी तपासण्यात आले आहेत. दरम्यान, कोरोनाबाधित भागातून आलेल्या व्यक्तींना भेदभावाची वागणूक देऊ नये, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. दरम्यान, जपानच्या जवळ उभ्या असलेल्या डायमंड प्रिन्सेस या क्रूज जहाजामधल्या आणखी तीन प्रवाशांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या जहाजावर लागण झालेल्या प्रवाशांची संख्या ६४ वर पोहोचली आहे. या सर्व प्रवाशांना दोन आठवड्यांसाठी स्वतंत्र कक्षात ठेवण्यात येणार आहे. जहाजावरच्या अनेक भारतीय कर्मचारी आणि प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली. कोरोना विषाणूचा विळखा क्रीडा विश्वालाही बसला असून फिलिपिन्समध्ये मनिला इथं येत्या 11 ते 16 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतून भारताच्या महिला संघानं माघार घेतली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महिला संघ या स्पर्धेत उतरणार नसल्याचं भारतीय बॅडमिंटन संघटनेनं स्पष्ट केलं आहे. पुरुषांचा संघ मात्र या स्पर्धेत सहभागी होणार असून आज रात्री ते मनिला साठी रवाना होतील. कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत काही शंका, समस्या अथवा अडचण असल्यास, +९१-११ २३९७८०४६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहनही सरकारनं केलं आहे.