У нас вы можете посмотреть бесплатно Interview of CM Shri Devendra Fadnavis at Lokmat или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Interview of CM Shri Devendra Fadnavis at Lokmat Maharashtrian Of The Year 2018 Award Ceremony in Mumbai on 10th April 2018 0:07 - हा सामना नाही मुलाखतीची तारीख घेतल्यापासून कोणतीही चर्चा नाही. कोणतेही सेटिंग नाही. लोकमतमध्ये कायम एकमत. कोणताही सामना नाही. 0:34 - ‘सामना’ टीका करतो सामनाची वेगळी गम्मत. सामना हे वृत्तपत्र मुंबई बरोबरच दिल्लीतही प्रसिध्द. पत्रकारांना सहज बातम्यांची उपलब्धता, कोणतेही संशोधन लागत नाही. सामनातील अनेक बातम्यांबाबत पत्रकार विचारणा करतात. सामनातील अनेक बातम्यांवर प्रतिक्रिया विचारल्या जातात. सामना रोज ब्रेकींग न्यूज देतो, टीका कळते. 4:09 - संघाच्या निर्णयाबाबत अलिप्तता राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची कामाची पद्धत निराळी, कामाचे स्वरुप वेगळे. एकमेव संघटन ज्यांची एकाचवेळी बसून निर्णय घेण्याची क्षमता. त्यानुसार कामकाज होते, त्यात कोणत्याही हस्तक्षेपाचा संबंध नाही. 5:01 - शिवसेनेचा अंदाज सहज शक्य शिवसेना हा राजकीय पक्ष, त्यात काय होणार हे सहज, सोप्पे, बोलायच्या गोष्टी वेगळ्या सांगायच्या असतात, त्यात राजकीय पक्षाला निर्णय घेताना अपरिहार्यता, राजकीय परिस्थती आणि सोय महत्वाची. अंदाज कधी बरोबर कधी चूक. 5:41 - शिवसेना-भाजपा युती शिवसेना हा पक्ष बाळासाहेबांच्या विचारांवर अवलंबून. देशातील तथाकथित सर्वधर्मसमभाव मानणारे, बाळासाहेबांच्या विचारानेच चालणारे धर्मनिरपेक्ष लोक जेव्हा एकत्र होतील, त्यावेळी हिंदुत्ववाद्यांना एकत्र यावेच लागेल, त्यावेळी बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या पक्षासाठी दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही. 7:04 - तर संजय राऊत मुख्यमंत्री शिवसेना 151 पेक्षा जास्त लढणार याबाबत ठाम, शिवेसेना भूमिका मागे घेण्यास तयार नसल्याने युतीमध्ये फूट. यात जर मित्र पक्षांना 19 जागा दिल्या असत्या, जर शिवसेनेला 127+ जागा मिळाल्या असत्या. तर मा. उद्धवजी मुख्यमंत्री झाले असते किंवा त्यांना शक्य नसते तर मा. संजय राऊतही मुख्यमंत्री होऊ शकले असते. 8:56 - मुख्यमंत्री पद मिळेल असे वाटले नाही मुख्यमंत्री होणार असे कधीच वाटले नाही. राजकारणात नगरसेवक म्हणून निवडून आल्यापासून ते आजपर्यंत असे कधीच वाटले नाही, कधी तरी मंत्रीपदापर्यंत पोहचता येईल याबाबत निश्चितता नव्हती. नगरसेवक, महापौर, आमदार, मंत्री ते थेट मुख्यमंत्री संधीचा विचार नव्हता. 9:33 - आपणच आपले ज्योतिषी ज्योतिषाला पत्रिका कधीच दाखवू नये, प्रत्येक ज्योतिषीचे म्हणणे वेगळे, त्यातून दिशा भटकते, त्यामुळे आपणच आपले ज्योतिषी मानावे. जे मनता आहे ते करावे. 9:53 - पाण्याची लोकचळवळ पाणी अडवा पाणी जिरवाचा मंत्र 1960 सालचा. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दुष्काळ मुक्तीचे काम, संपूर्ण राज्यात जलयुक्तच्या माध्यमातून लोकचळवळ. पाण्यासाठी लोकांनी ही लोकचळवळ उभारली. 11:10 - महाराष्ट्राच्या इतिहासातले सर्वाधिक उत्पादन राज्यात जलयुक्त शिवारमुळे सिंचनक्षमतेत वाढ, परिणामी उत्पादनातही वाढ. गेल्या 10 वर्षात जेवढे उत्पादन वाढले तेवढेच रब्बीच्या चांगल्या उत्पादनाची त्यात भर. ज्यावेळी 125% पाऊस पडला तेव्हा जितके उत्पादन होते तेवढेच उत्पादन फक्त जलयुतक्त शिवारच्या किमयेमुळे. 11:39 - भाजप सरकारचा रिमोर्ट कोणाकडे? भाजप सरकारमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा कोणताही हस्तक्षेप किंवा निर्णयाबाबत दबाव नाही. स्वातंत्र्य आहे, आग्रह फक्त केंद्राच्या कॉमन अजेंड्याचा. राज्यातील एखादे काम अडवा अथवा करा याबाबत पूर्ण स्वातंत्र्य. 18:03 - कर्जमाफीची तपशीलवार माहिती एकूण शेतकऱ्याची प्रत्येक जिल्हा-बॅंक यानुसार कर्जमाफीची तपशिलवार माहिती कधीही उपलब्ध. 20:23 - भीमा कोरेगाव प्रकरणी कायदा-सुव्यवस्था सुरळीत भीमा कोरेगावच्या घटनेचा निषेध. घटना चुकीचीच. 8-10 लाख लोक एकत्र आले, काही नुकसान निश्चित, बंदचा फज्जा, मात्र परिस्थिती नियंत्रणात. देशातील इटर घटनांची तुलना करता कायदा- सुव्यवस्था सुरळित राखण्यात यश. 21:57 - मुख्यमंत्र्याकडेच गृहमंत्री पद असावे राज्यात गृहमंत्री पद हे मुख्यमंत्र्यांकडे असणे आवश्यक. गृहविभागाचे जवळजवळ सर्व निर्णय हे मुख्यमंत्र्यांना घ्यावे लागतात. राज्यघटनेच्या व्यवस्थेनुसार गृहविभागाचे सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेण्याचे बंधन. 24:07 - सर्वच राजकीय पक्षांना आत्मपरिक्षणाची गरज सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये गुन्हेगार. एखादा गुन्हेगार जेव्हा राजकीय पक्षात प्रवेश करतो त्यामागे काही वेगळे सूचक. त्याकडून त्याला विशिष्ट सुरक्षितता हवी असते पण या पासून सुटका करायची असेल तर सगळ्याच राजकीय पक्षांना आत्मपरिक्षणाची गरज. 26:08 - कोठड्या भरणे सुरु आधीच्या राज्यकर्त्यांविरोधात ट्रकभर पुरावे आणि जवळजवळ 21 जणांवर एफआयआर. भ्रष्टाचाराचा राज्यातल्या तिजोरीवर परिणाम. यातील अनेक जणांवर कारवाई, कोठड्या रिकाम्या होत्या, त्या आता भरणे सुरु. 27:25 - मोदी, भाजप, एनडीएवर विश्वास जनतेचा भाजप सरकारवर विश्वास. सामान्य माणसाचा विश्वास माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीवर. देशातील प्रामाणिक, गरीब माणूस हा मोदी, भाजप आणि एनडीएच्या पाठीशी. 28:15 - काळापैसा परत आला देशाच्या खात्यात 15लाख जमा होण्यास सुरुवात, एकाही देशाशी करार नसल्याने डिसक्लोजरशी करार झाला नव्हता. भाजपने काळापैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्यानंतर आता 100 पेक्षा टॅक्स सेव्हर बरोबर करार झाला. 20 वर्षात जितका काळा पैसा परत आला नाही तेवढा गेल्या 2 वर्षात आला. 29:20 - पक्षाचा सैनिक , जे मिळेल ते करणार पक्षाचा सच्चा सैनिक आहे. पक्षाने क्षमतेपेक्षा अधिक दिले. पक्षावर अधिक विश्वास. पक्षाने कधी सांगितले दिल्लीला जा तर दिल्लीत जाणार, कधी सांगितले नागपूरला जा, तर नागपूरला पुन्हा जाणार. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार. #देवेंद्रफडणवीस #DevendraFadnavis Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔