У нас вы можете посмотреть бесплатно Dr Sampada Munde | देवेंद्र फडणवीस यांनी लाज सोडली, भाजपच्या घरगड्याला चौकशी अधिकारी म्हणून नेमले или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#devendrafadnavis #GhanashyamSonavane #sampadamunde #ranjitnaiknimbalkar #jaykumargore #laybharinews #tusharkharat #drsampadamunde वडूज पोलीस कोठडीत असताना पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांनी मारहाण केली होती. स्वतः घनश्याम सोनावणे यांनी मला खाली बसवून माझ्या दोन्ही मांड्यावर बुट घातलेले पाय ठेवून उभे राहिले होते. कांबळे नावाचे पोलीस अधिकारी गुडघ्यावर बसले होते. शिरकुळे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने पायाच्या तळव्यावर पट्ट्याने प्रचंड मारहाण केली. वेदनेमुळे पाय सोडवून घेतल्यानंतर घनश्याम सोनावणे यांनी पाठीमागून माझ्या पाठीत त्यांचे स्वतःचे गुडघे रूतवले होते. त्यानंतर हात पुढे करायला लावून हातावर पट्ट्याने मारहाण केली होती. याबाबत मी दुसऱ्या दिवशी न्यायालयासमोर लेखी तक्रार केली. त्यावर न्यायालयाने गंभीर दखल घेतली. न्यायालयाने सातारा जिल्हा रूग्णालयाला लेखी आदेश देवून आरोग्य तपासणी करण्यास सांगितले. परंतु तिथे पोलिसांनी डॉक्टरांवर दबाव टाकून खोटा रिपोर्ट तयार करायला लावला. खरेतर माझ्या हाताची बोटे सुजलेली होती. पायाचे तळवे ठणकत होते. पण पोलिसांची जिल्हा रूग्णालयासोबत मिलीभगत असल्यामुळे खाकी वर्दीतील गुंड घनश्याम सोनावणे व त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीच्या खुणा अहवालात येणार नाहीत, याची काळजी पोलिसांनी घेतली. खोट्या गुन्ह्यामध्ये फलटणचे सध्या वादात सापडलेले पोलीस उपअधिक्षक राहूल धस हे तपास अधिकारी होते. खरेतर वडूज पोलीस ठाणे राहूल धस यांच्या कार्यक्षेत्रात येत नाही. परंतु ते भाजप नेत्यांचे घरगडी असल्याप्रमाणे भाजप नेत्यांना हवा तसा तपास करतात. त्यामुळेच त्यांच्याकडे या खोट्या घटनेचा तपास करण्याची जबाबदारी दिल्याचे तुषार खरात यांनी म्हटले आहे. या राहूल धस यांनी तपासाच्या नावाखाली माझ्या मुंबईतील कार्यालयात व घरात धाड टाकली. कार्यालयातील सगळे संगणक, लॅपटॉप, मेमरी कार्ड असे २५ प्रकारचे इलेक्टॉनिक्स साहित्य व इतर बरेच साहित्य ताब्यात घेवून गेले. माझ्या मुलीची दहावीची परीक्षा सुरू असताना घरात धाड टाकून मुलीच्या अभ्यासाचा लॅपटॉप पोलिसांनी नेला. वास्तवात तक्रारच खोटी असल्यामुळे हे साहित्य नेण्याचे काहीही कारण नव्हते. परंतु जयकुमार गोरे यांच्या विरोधातील पुरावे तपासून ते नष्ट करण्यासाठी पोलिसांनी हे साहित्य बेकायदेशीरणे दरोडेखोरासारखे नेल्याचा संतप्त आरोप तुषार खरात यांनी केला आहे. राहूल धस यांच्या या कृतीमुळे मी रिझर्व्ह बँक परिसरात स्वकष्टाने उभारलेले लय भारीचे कार्यालय बंद पडले. लय भारी ही महाराष्ट्रातील एकमेव डिजिटल न्यूज मीडिया कंपनी आहे की, ज्या कंपनीला गुगलने १६.६५ लाख रूपयांचे अनुदान दिले होते. हे अनुदान व आयुष्यभराची कमाई खर्च करून मी हे कार्यालय उभे केले होते. पण पोलिसांनी ते बंद पाडले. पोलिसांनी हे साहित्य नेण्याची काहीही गरज नव्हती. पोलिसांनी मुंबईला जायचीच गरज नव्हती, असे न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढलेले आहेत. या एट्रॉसिटीच्या गुन्ह्यात काहीही तथ्य आढळत नाही, असे न्यायालयाने जामीन देताना म्हटले आहे. जयकुमार गोरे व पोलिसांनी दडपशाही केली याबाबत मी पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांना भेटून त्यांच्याकडे २२ पानांची लेखी तक्रार दाखल केलेली आहे. परंतु तुषार दोशी यांनी पोलिसांची पाठराखण केली. ते उघडपणे पोलिसांना पाठीशी घालत आहेत. खरेतर, जयकुमार गोरे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांच्यावर २४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. फलटणपेक्षाही भयानक दहशत जयकुमार गोरे यांनी माण – खटावमध्ये माजवलेली आहे. मायणी महाविद्यालय, सिद्धनाथ पतसंस्था त्यांनी हडपली आहे. त्यांच्या वाहनाने दोघांचा बळी घेतलेला आहे. त्यांच्या कार्यर्त्यांनी एका नागरीकाला लोखंडी रॉडने पाय मोडेपर्यंत मारहाण केलेली आहे. जयकुमार गोरे यांनी टेंडर माफिया, वाळू माफिया मोठ्या संख्येने निर्माण केले आहेत. गोरे, माफिया व पोलीस यांची अभद्र युती झालेली आहे. अक्षय सोनावणे हा पोलीस अधिकारी १० वर्षांपासून माण व फलटण या दोन तालुक्यांतील पोलीस ठाण्यात आहे. जयकुमार गोरे यांचा हस्तक म्हणून हा अक्षय सोनावणे निरपराध लोकांवर खोटे गुन्हे दाखल करीत असतो. तो सध्या म्हसवड पोलीस ठाण्यात कार्यरत असला तरी माण – खटावमधील सगळ्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना धाकात ठेवून तिथे जयकुमार गोरे यांना हवे तसे सामान्य लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम करीत असतो. जयकुमार गोरे मंत्री झाल्यानंतर तर निरपराध लोकांना खोटे गुन्हे दाखल करणे, गोरे यांच्यावर टीका करणाऱ्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांना दमदाटी करणे असे प्रकार मोठ्या संख्येने सुरू झाले आहेत, याकडे तुषार खरात यांनी लक्ष वेधले आहे. माझ्यावर झालेल्या या अन्यायाची पोलीस व सरकार दखल घेत नाही. दुसऱ्या बाजूला जयकुमार गोरे, पोलीस व माफिया यांनी माण – खटावमध्ये तालिबानी राज्य सुरू केले आहे. हे सगळे भयानक प्रकार जनतेसमोर येणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस यांचेच गोरे, पोलीस व माफिया यांना प्रोत्साहन आहे. त्यामुळे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी सुद्धा डॉ. संपदा मुंडे यांच्या प्रमाणे आत्महत्या करू का ? असा सवाल तुषार खरात यांनी केला आहे. डॉ. संपदा मुंडे यांनी पोलिसांकडे तक्रारी करूनही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. मी तर पत्रकार आहे. जयकुमार गोरे व पोलिसांचे अत्याचार मी माझ्या यू ट्यूब चॅनेलवरून घसा फोडून सांगतोय. पोलिसांकडे लेखी तक्रारी करतोय, तरीही गेंड्याच्या कातडीचे फडणवीस सरकार दखल घेत नाही. त्यामुळे माझ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आत्महत्या करणे हाच पर्याय योग्य आहे का ? असा सवाल तुषार खरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.