У нас вы можете посмотреть бесплатно उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरण गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाडला क्लिनचिट?... или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरण गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाडला क्लिनचिट?... महेश गायकवाड यांनी व्यक्त केली नाराजी पोलिसांवर राजकीय दबाव, राजकीय दबावामुळे पोलीस हाताश पोलिसांना दोष देणार नाही मात्र राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याचा आरोप. काही महिन्यांपूर्वी कल्याण पूर्वचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहर अध्यक्ष महेश गायकवाड यांच्यातील आपसातील वादातून उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गणपत गायकवाड यांनी आपल्याकडील बंदुकीतून महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या चालवल्या होत्या. त्यामध्ये महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे, खासदार श्री.श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील जुपिटर हॉस्पिटल ला जाऊन महेश गायकवाड यांच्या तब्येतीची पाहणी करत विचारपूस केली. अगोदर वैभव गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातील बाचावासी झाल्याचे सांगितले गेले त्यानंतर गोळीबार प्रकरण झाले महेश गायकवाड यांच्याकडून माजी आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी झाली परंतु या प्रकरणी वैभव गायकवाडला क्लिनचीट मिळाली अशाप्रकारे अनेक आरोप महेश गायकवाड यांच्याकडून करण्यात आले आहे. माध्यमांचे संवाद साधत महेश गायकवाड यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, आपल्या माध्यमातून मला कळाले वैभव गायकवाडला क्लीनचिट मिळाली जो आरोपी वैभव गायकवाड हा घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद आहे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद असल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहे, लोक उघड्या डोळ्यांनी बघत आहेत की अशाप्रकारे कायदा सुव्यवस्था निर्माण झालेले आहे जी राजकीय दबावाखाली काम करते, पोलीस प्रशासना गेल्या वर्षभरापासून अनेक अर्ज केले माहितीचे अधिकार टाकले, आरोपींनी बाळगलेल्या पिस्तुलाचे लायसन्स रद्द केलेले नाहीत, नियोजित कटातील बाहेर उभे असलेल्या आरोपींचा गुन्ह्यात समावेश केलेला नाहीये, आपण अशा घटना बघतो की जो आरोपी घटनास्थळी नसताना त्यांना जेलमध्ये टाकलेले आहे या प्रकरणात तर उभ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी बघितले आहे वैभव गायकवाड घटनास्थळी सर्वप्रथम आला त्याने गणपत गायकवाड यांना बोलावले ज्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असलेले अनेक गुंड बोलवण्याचे कार्य वैभव गायकवाडने केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात पुराव्या असताना सुद्धा क्लीन चीट देणे हे अतिशय दुर्दैवी आहे. आज मला कोणत्याही प्रकारचे राजकीय पाठबळ नसल्यामुळे हे झालेले आहे, हत्या प्रकरण झालेले आहे त्याच्यामध्ये देशमुख कुटुंबियांना कुठेतरी राजकीय बळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात SIT, क्राइम ब्रांच, सीबीआय यांच्याकडून चौकशी होऊन आरोपींना अटक करण्यात आले आहे. त्यामुळे इकडे राजकीय पाठबळ नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. वकिलाशी बोलणे झाले असून आपण वरच्या कोर्टात दाद मागणार आहोत पोलीस हाताश आहेत पोलिसांना दोष देणार नाही. त्यामुळे राजकीय पाठबळ नसल्यामुळे सगळं झाले आहे पुढे या प्रकरणी महेश गायकवाड काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहेत.