У нас вы можете посмотреть бесплатно धर्मवीरगड | इथेच छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे आणि जीभ काहडन्यात आली | Bahadurgad | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बहादूर गड किंवा धर्मवीरगड तथा पेडगावचा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यात दौंड जवळ आहे. स्थान बहादूरगड पुण्यापासून सुमारे १०० किलोमीटर (६२ मैल) अंतरावर आहे. जवळचे शहर श्रीगोंदा आहे. हा किल्ला भीमा नदीच्या उत्तरेकडील श्रीगोंदा शहराच्या दक्षिणेस सुमारे ११ किलोमीटर (६.८ मैल) अंतरावर पेडगाव या गावात आहे. या किल्ल्याचा फार कमी इतिहास सर्वांना माहित आहे. मुघल साम्राज्याच्या काळात पेडगाव हे मुघल सैन्याचे मुख्य ठिकाण होते. १६७२ मध्ये दख्खनेतील मुघल सेनापती बहादूर खान (औरंगजेबाचा दुधभाऊ) आणि त्याचा मामा याने येथे तळ ठोकला आणि शिवाजी महाराजांच्या मराठा सैन्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. भीमा नदीतून पाणी आणण्यासाठी बहादूरखान याने जलवाहिनी बांधली. यावरील मोट आणि पर्शियन चाक आजही शाबूत आहेत. बहादूरखानाने या किल्ल्याचे नाव बहादूरगड असे ठेवले. यानंतर त्याच्या विरुद्ध स्वराज्यात पेडगावची मोहिम आखली गेली आणि त्या मोहिमेचे प्रमुख सरदार होते स्वतंत्र स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांच्या सोबत होते अनाजीपंत, मोरोपंत पिंगळे, येसाजी कंक, म्हाळोजी घोरपडे व त्यांचा मुलगा संताजी घोरपडे, धनाजी जाधव, बहिर्जी नाईक व त्यांचा साथीदार नंदी इ. या पेडगाव मोहिमेचा खरा उद्देश होता तो त्या बहादूर खानाने लुटून आणलेले हिंदू देव-देवता त्याच्याकडून परत आणायचे त्यात होता मोरगावचा मयुरेश्वर, कुरकुंभ गावची ग्रामदेवी फिरंगाईदेवी, आणि अनेक मंदिरांचे कळस इ. या मोहिमेत सरसेनापतींनी ९,००० सेनेच्या दोन तुकड्या केल्या होत्या, त्यापैकी स्वतःसोबत त्यांनी २,००० सेना आणि बाकिची ७,००० सेना ही येसाजी कंक, म्हाळोजी घोरपडे आणि मोरोपंत पिंगळे यांना दिली होती, त्यांनी पेडगाव लुटायचा बेत आखला होता तो असा बहादूरगडच्या मुख्य दरवाजावर त्यांची ७,००० सेना उभी केली आणि त्यांना आदेश दिला कि बहादूरखानाची सेना आली तर उल्ट जंगलात पळायच म्हणजे इकडे त्यांना देव परत आणायला वेळ मिळेल आणि अशाप्रकारे हंबीररावांची सरसेनापती म्हणून पहिली मोहिम फत्ते झाली. आत औरंगजेबाचा दुमजली महाल आहे. १७५९ मध्ये पेडगाव हे सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी ताब्यात घेतले आणि ते १८१८ पर्यंत मराठ्यांकडे राहिले. [२]