У нас вы можете посмотреть бесплатно * или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
प्रिय शेतकरी मित्र, आज डाळिंब /कांदा प्लाट भेट प्रसंगी श्री सोमनाथ शेठ शेलार,जय भवानी कृषी सेवा केंद्र येसगाव व मथुरपाडे,तालुका - मालेगाव,नाशिक,झाड संख्या ४२०,दुसरा बहर,पानगळ दिनांक २७ डिसेंबर २०२६! आजचा वीडियो बनवण्या मागचे २ हेतू आहेत ते खालील प्रमाणे: १) रासायनिक खतांचा वापर किवा मारा हा आपण सतत व प्रत्येक पिकात हा मागील ४०/५० वर्षापासून केल्याने आपल्याला त्याचे दुष्परिणाम आहे मागील ८/१० वर्षापासून दिसत आहेत…सर्वात प्रथम म्हणजे पिकाची उत्पादकता व दुसरी पिकाची गुणवत्ता ही ढासळत चालली आहे,यामुळे जमिनीतील भौतिक अवस्था खराब होत चाललाय आहेत व हे नापिकतेकडे भविष्याची वाटचाल आपण करत आहोत हे चित्र काही वर्षात आपल्याला दिसेन. आज आपण शेतकरी बांधव अजूनही रासायनिक खतांविषयी प्रेम किवा विश्वास हा कमी होण्यास तयार नाही……भारी भारी लिक्विडस खते हे दर वर्षी आपण टाकतो आहे……..त्यातला त्यात महाराष्ट्रात तर आपण सर्वात जास्त वापर केलेला हा दिसतो १९९१ पासून,आज परराष्ट्र व अंतर्गत देशातल्या कंपन्या या वेगवेगळ्या लिक्विड च्या ग्रेडस तसेच युरिया साठी भटकंती व इतर मिश्र खते यासाठी अक्षरश आपण अट्टाहास धरून बसलेलो आहोत…..नाही कांद्याला १०:२६:२६ च पाहिजे,कांद्याला गोल मारले की उरिया च पाहिजे किवा काही शेतकरी हे अमोनियम सल्फेटच पाहिजे…….तसेच लिक्विड खतांच्या बाबतीत मोठ्या पिकांमध्ये म्हणजे द्राक्ष,डाळिंब व इतर फळ वर्गीय पिके त्या मधे वेल वर्गीय पिके यांचा पण समावेश होत असतो……आपला या रासायनिक कंपनीना कोणताही आक्षेप नाही,पण आपण बघत असतो मर,पिथियम,विल्टिंग,शॉक किवा स्ट्रेस मधे पिके ही जात असतात……तेवढ्या पुरता तेवढ्या क्षणिक रिझल्ट्स हे बघत असतो पण ते शाश्वत नाही……यामुळे जबरदस्त जमिनीच्या भौतिक अवस्था वर दुष्परिणाम दिसत आहे…ते वीडियो मधे कश्या पद्धतीने आपल्या जमिनीत आपण वाढवत आहोत ते सांगण्याचा प्रयत्न असून……खास करून ज्या ज्या ठिकाणी विशाल नद्या किवा डैम/धरणे आहेत त्या ठिकाणी असा प्रॉब्लम मोठ्या प्रमाणात निर्माण होताना दिसतोय…….त्यामुळे श्री बायो कडून भारतात सोईल फर्स्ट म्हणजे माती प्रथम च्या माध्यमातून आपल्या पर्यंत इंदिरूत्स व हेलो चेक सारखी उत्पादने वापर आपल्या जमिनीमध्ये करणे आवश्यक आहे व हेच धोरण घेऊन श्री बायो एस्थेटिक्स ही भारतात,महाराष्ट्र मधे विविध जिल्ह्यात काम करत असताना………भारतीय व महाराष्ट्रा कृषी विभाग कडून जैविक खते पुरस्कृत वापर केली जात आहेत विषमुक्त शेती या कांसेप्ट ला प्रोत्साहन दिले जात आहेत. २) डाळिंब पिकात खूप शेतकरी हे आंबिया बहर मधे किवा कोणत्याही ५ बहर मधे(मृग,वर्षा,हस्त,वसंत व अंबिया बहर) छाटणी ही पानगळ करण्यापूर्वी घेऊन ठेवतात असतात व वेळेनुसार ७/८/१०/१५ दिवसात पानगळ ही घेत असतात…….यामुळे जमिनीत ओलावा असल्याने पत्ती ही लिक होऊन जाते म्हणजे नवीन पालवी निर्मित होते किवा २-४ इंच केन/वॉटरशूट ही निघून जात असते व त्यावर आपण पानगळ ही घेत असतो…..त्या ठिकाणी काही शेतकरी पूर्णपणे पानगळ व्हावी यासाठी कडक पानगळ म्हणजे इथेलीन चा वापर बेसुमार पण करत असताना दिसतात,असे करू नये शेवटी नुकसान हे आपलेच होते……पण लक्षात घ्यावे की आपल्याला पानगळ ही लगेच घेणे आहे…….ही एक महत्वाची नोंद आहे हे आपण सर्व डाळिंब बागायतदार नी लक्षात घ्यावी,काय आहे एकदा चूक झाली ना तर ती डायरेक्ट पुढील वर्षी साठी अनुभव असेन……व ते आपण वीडियो मधून सांगण्याचा प्रयत्न आहे. आज लेख पूर्ण करत असताना एवढेच लिहीन की,वेळ ही अमूल्य आहे,एकदा गेलेली वेळ ही आपण भरून काढू नाही शकत…….वातावरण बदल च्या हिशोबाने आपल्याला प्रॅक्टिस मधे बदल व रासायनिक खते मात्रा ही येथून पुढे कमी करणे हे आपले धोरण असायला हवे……काय आहे उत्पादन वाढीच्या हव्यासापोटी आपण आपल्या जैव सुष्टीचा खराबा करणे लावले आहे…….त्यामुळे जसे आपले कर्म असतील तसे प्रकृती ही आपल्याला बरकती देईल असे मला जाणवते. आपला कृषी मित्र, शामकांत महाजन, श्री बायो एस्थेटिक्स, फुलंब्री,छ संभाजी नगर 82755 06166!!!