У нас вы можете посмотреть бесплатно दृष्टांतपाठ - निर्मिती स्वरूप आणि महत्त्व или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
दृष्टांतपाठ या ग्रंथाचा परिचय ग्रंथनिर्मिती प्रक्रिया पंडित केशिराज व्यासांनी सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या अवतारकार्यावर आधारित असलेला लीळाचरित्र या ग्रंथातून दृष्टांत वेचून काढले. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी तत्त्वज्ञान समजून सांगण्यासाठी प्रसंगोपात्त काही दृष्टांत निरूपण केले आहेत. यातूनच निवडक 114 दृष्टांत पंडित केशीराजव्यास यांनी निवडले. त्याचाच 'दृष्टांतपाठ' हा ग्रंथ निर्माण झाला. इसवीसन १२८० मध्ये हा ग्रंथ लिहिला गेला. ग्रंथाचे स्वरूप 'दृष्टान्तपाठां 'त प्रत्येक दृष्टान्तारंभीं सूत्रविभाग आहे. या विभागांत प्रत्येकी एकेकच सूत्र आहे, असें नाहीं. जेथें एकाहून अधिक सूत्र एके ठिकाणीं आर्टी आहेत, तेथें तीं 'सूत्रपाठां 'तून क्रमानें घेतलेलीं आहेत, असें नाहीं. अगदीं वेगवेगळ्या ठिकाणचीं सूत्रेहि अर्थानुरोधानें एकत्र आणून दृष्टान्त यांचा त्यांच्यार्थी मेळ साधण्याचा प्रयत्न केला आहे." ग्रंथाचे महत्त्व "मराठी भाषेतील पहिला कथा संग्रह म्हणून हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाचा एक आधारग्रंथ, आद्य मराठी गद्याचा एक मूल्यवान् अलंकार आणि तेराव्या शतकांतील महाराष्ट्राच्या समाजजीवनाचीं कांहीं चित्रे प्रतिबिंबित करणारा एक आरसा-अशा त्रिविध दृष्टीने दृष्टान्तपाठाचे अध्ययन महत्त्वाचें आहे." ग्रंथाचे वैशिष्ट्य केशिराजांचा हा ग्रंथ तत्त्वज्ञानदृष्ट्या. समाजदर्शनदृष्ट्या जसा लक्षणीय आहे, तसाच त्यातील दृष्टांतसौंदर्य व भाषाशैली या सर्वच दृष्टींनी अपूर्व आहे. यादवकालीन मराठी गद्याचा आरसा असलेला हा मौलिक ग्रंथराज पंडिती वळणाचे प्रतिनिधीत्वही करतो. स्वामींनी सांगितलेल्या दृष्टांतात साधेपणाबरोबरच अत्यंत सूक्ष्म महानुभाव तत्त्वज्ञान भरलेले आहे. समारोप या ग्रंथात चक्रधरस्वामींनी सांगितलेले ११४ दृष्टांत (बोधगर्भ छोटी कथा) आहेत, जे तत्त्वज्ञान स्पष्ट करण्यासाठी सांगितले होते. हा ग्रंथ विचारप्रतिपादन, तत्त्वज्ञान, मांडणी, भाषाशैली आणि समाजजीवनाचे मार्मिक निरीक्षण या दृष्टीने अपूर्व आहे. मराठी भाषेचा अभिमान असणाऱ्या प्रत्येकाने हा ग्रंथ एकदा तरी वाचलाच पाहिजे.