У нас вы можете посмотреть бесплатно Harishchadragad Trek | हरिश्चंद्रगड | Harishchandragad Vlog | Konkankada | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Harishchandragad Trsk, Konkankada, Kedareshwar Cave Temple, Pachnai. हरिश्चंद्रगड, कोंकणकडा, केदारेश्वर गुफा, पाचनई. #harishchandragadtrek #harishchandragad #harishchandra #pachanai #bhatake #maharashtratourism #maharashtra #trekkersofmaharashtra #destination राजा हरिश्चंद्र व हरिश्चंद्रगडावरील स्मृती शिल्प : एखाद्या सज्जन किंवा नेहमी खरं बोलणाऱ्या व्यक्तीला आपण अगदी सहज हरिश्चंद्राची उपमा देतो. हरिश्चंद्र आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीच खोटं बोलले नाहीत असं म्हटलं जातं, कोण होते हरिश्चंद्र ? त्यांचा व हरिश्चंद्रगड याचा काय संबंध ?? या बाबत मला असलेली माहिती थोडक्यात देतो. हरिश्चंद्र एक पौराणिक दानशूर राजा, कसोशीने सत्त्वपालन करणारा राजा अशी त्याची विशेष ख्याती होती. पत्नीचे नाव तारामती, हरिश्चंद्र राजाला रोहित किंवा रोहिदास हा मुलगा होता. एकदा इंद्रसभेत सर्व देवांसमोर गुरू वसिष्ठांनी हरिश्चंद्राची स्तुती केली. तेव्हा गुरू विश्वामित्रांनी त्याचे सत्त्व पाहण्याचे अनेक प्रयत्न केले .विश्वामित्र हरिश्चंद्रच्या स्वप्नात जाऊन दक्षिणेनिमित्त सर्व राज्य व अडीच भार सोने मागितले. हरिश्चंद्राने त्यास राज्य देऊन सोन्याच्याभरती करिता पत्नी तारामती व पुत्र रोहित / रोहिदास यांस विकले आणि स्वतःसहीएका चांडाळास विकून घेतले. या चांडाळाने स्मशानभूमीतील प्रेतांचीवस्त्रे व द्रव्य आणण्यासाठी हरिश्चंद्राची योजना केली. इकडे रोहितास विश्वामित्राने सर्पाकडून मारविले आणि तारामती आपलीच पोरे भक्षण करणारी राक्षशीण आहे, असे लोकांना भासवून तिला मारण्यासाठी चांडाळाकडे नेले. तिथे तिला मारण्यासाठी चांडाळाने हरिश्चंद्राला आज्ञा केली. जेव्हा तिने जन्मोजन्मी हेच पती, पुत्र, गुरू व विश्वामित्रांसारखे याचक मिळावेत, अशी शेवटची इच्छा दर्शविली, तेव्हा विश्वामित्र सद्गदित झाले व त्यांनी हरिश्चंद्रास पत्नी आणि पुत्रासह संकटातून सोडवून पुन्हा राज्यावर बसविले. राजा हरिश्चंद्राच्या करुणोदात्त, हृदयद्रावक कथांवर नामदेव, जनाबाई, विष्णुदास, कृष्णयाज्ञवल्की, मुक्तेश्वर, श्रीधर अशा अनेक संत–माहात्म्यांनी लिहिले असले, तरी या सर्वांमध्ये जनाबाईचे हरिश्चंद्राख्यान विशेष लोकप्रिय आहे. ‘हरिश्चंद्राची सत्त्वपरीक्षा पाहण्यासाठी विश्वामित्र ऋषी त्याचे राज्य स्वप्नात मागून घेतात. स्वप्नात दिलेले दान हरिश्चंद्रदुसरे दिवशी जागेपणी मान्य करतो व राज्य सोडतो ‘, अशी कथाजनाबाईने मोठ्या कल्पकतेने रचली आहे. गुरू वसिष्ठांनी हरिश्चंद्र राजाला आशीर्वाद दिले की जो पर्यंत ही सृष्टी असेल तो पर्यंत सत्य सर्वोतोपरी असेल आणि त्या वेळी तुझी आठवण येईल. आत्ता आपण ज्याला आपण हरिश्चंद्रगड गड म्हणून ओळखतो ती एक पवित्र तपोभूमी असून गुरू च्या आशीर्वादाने तिला हरिश्चंद्रगड म्हणून ओळखले जाऊ लागले. हरिश्चंद्रगड राजा हरिश्चंद्र याने बांधला नसून , सत युगात तो अयोध्या येथे राज्य करत होता. हरिश्चंद्र याचे हरिश्चंद्रगड येथील स्मृती स्थळ असून , तेथे तो कावड घेऊन जात असल्याचे शिल्प आहे. त्याच्या समोर एक टाके असून तो ते पाण्याने भरण्याचा प्रयत्न करत होता मात्र विश्वामित्र यांनी मुद्दाम त्रास देण्यासाठी त्याला एक छिद्र पाडले जेणे करून ते कधीही भरू नये. हरिश्चंद्रगडावर गेल्यावर ते शिल्प आवर्जून पहा व त्या सत्यवादी राजाची आठवण करा, ज्याने स्वप्नात दिलेले वचनही जागतेपणी कुटुंबासह अपार कष्ट करून , प्रसंगी प्राण आहूती देण्याची तयारी ठेवून पूर्ण केले . इतिहास: ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड होय. एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. हरिश्चंद्रगडाची निर्मिती ५व्या अगर ६व्या शतकात त्रैकूटक अगर कलचुरी या राजघराण्यांच्या कारकिर्दीत झाली असावी असे मानले जाते. हरिश्चंद्र पर्वत फार पुरातन काळापासून ज्ञात असावा. कारण काशीखंडात, अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात याचा उल्लेख आढळतो. शिवरायांनी हरिश्चंद्रगड १६७०-७१ च्या दरम्यान जिंकून घेतला. पुढे १६८८-९० दरम्यान याचा ताबा मोघलांकडे गेला. नंतर खूप मोठी मोघल राजवट अनुभवल्यानंतर हा किल्ला मराठ्यांनी पेशवाईत १७४७ मध्ये जिंकला. १७५१ मध्ये गडाचा कारभार माहुली किल्ल्याचे किल्लेदार कार्नाजी शिंदे यांच्या अखत्यारीत असताना त्यांनी गडाच्या डागडुजीची अनेक कामे पूर्ण करून घेतली. पुढे हरिश्चंद्रगडाचा शेवटचा किल्लेदार हरिश्चंद्रगडकर जोशी यास येथे मे महिन्याच्या सुरुवातीस १८१८ साली कर्नल साईक्स या गोऱ्या साहेबांशी झुजतना वीरोचित मरण आले. पोहोचण्याच्या वाटा : हरिश्चंद्रगड पूर्ण पाहवयाचा असल्यास दोन ते तीन दिवसांची सवड काढली पाहिजे. गडाचा घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही अनेक आहेत. इथे मी ज्या वाटेने गेलो त्याची माहिती देत आहे.नगर जिल्ह्यातून ( पाचनई मार्गे), हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी मुंबई - नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी यावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते. राजुर - पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी भरते. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे १:३० ते २ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ किमी आहे. खाजगी गाडीने सरळ पाचनई पर्यंत येऊ शकतो. राहाण्याची सोय : गडावरील गुहांमध्ये ५० ते ६० जणांची राहाण्याची सोय होते. तसेच पैसे दिल्यास राहाण्यासाठी तंबू उपलब्ध होतात. जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय उपलब्ध आहे. पाण्याची सोय : पाणी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे.